मला व्हायचयं तो शाहूंचा समतेचा विचार, प्रतिगामी विचारांना लोळवणारा.... अन् आपल्या अस्तित्वाच्या जोरावर, समतेचा दीप सर्वत्र चेतवणारा.... मला व्हायचयं ज्योती-सावित्रीची कणखर लेक, समाजविकासासाठी दगड-धोंडे झेलणारी... अन् या गतिमान काळात निडर बनून, स्वत:चं स्वत:च्या हिंमतीवर संकट पेलणारी..... मला व्हायचयं ती बाबासाहेबांची लेखणी, मनामनांत स्वाभिमान फूलवणारी.... अन् इथल्या जातीयतेच्या वाळवंटात, समता-बंधूता-न्यायाची पेरणी करणारी.... मला व्हायचयं गाडगेबाबांची वारसदार, स्वच्छतेची पाईक असणारी.... केवळ भौतिक परिसरचं नाही तर, माणसांची मनं स्वच्छ करणारी.... मला व्हायचयं कबिराची संतवाणी, माणसांच्या बुद्धीवरचा गंज दूर करणारी.... सत्य अन् वास्तवाच्या जोरावर, अंधारलेली मनं लख्ख उजळवणारी..... मला व्हायचयं आधूनिक स्वामी विवेकानंद, भारतीय संस्क्रुतीच्या पताका जगभर फडकवणारा.... चाँकलेट-पिझ्झा-बर्गरच्या या जमान्यात, स्वदेशी भाकरीच्या अस्तित्वाला जपणारा..... मला व्हायचयं डाँ.नरेंद्र दाभोळकर, परंपरागत विचारांशी दंगल करणारा..... गोळ्या जरि झाडल्या सनातान्यांनी तरी,...
मला वाटतं खडबडून जागं व्हाव तिने, अन् बनाव स्वत:चं स्वत:चा आधार.... पाँलिश्ड् मुखवट्यांच्या या दूनियेतं, इतरांवर विसंबून करू नये स्वत:ला निराधार.... मला वाटतं व्हाव तिने काळाकूट्ट काजवा, अंधारातही स्वत:चं तेज निर्माण करणारा.... होवूचं नये तिने ते मनमोहक फुलपाखरू, क्षणातचं आपलं अस्तित्व गमवणारं.... मला वाटतं व्हाव तिने तो समतेचा विचार, शाहू-फूले-आंबेडकरांना अभिप्रेत असणारा.... उगाचचं का आचरावा तिने, पोथ्यात रमवणारा कर्मठ अन् प्रतिगामी विचार.... मला वाटतं व्हाव तिने बेशरमाचं झाड, विषारी विचारांना मूळापासून संपवणार.... का व्हाव तिने ते लाजाळूचं रोपटं? क्षणातचं आपलं अस्तित्व मिटवणारं.... मला वाटतं व्हाव तिने राकट बहिनाबाई, अन् अंकूरावी तिच्या प्रतिभेतून ओवी.... उगाचचं का वाचावीतं तिने पोथी-पूराणे, अन् का करावी आपल्या प्रतिभेची राखरांगोळी.... मला वाटतं व्हाव तिने भिमरावांची रमाई, नवऱ्याची सावली बननारी कणखर बाई.... का करावी तिने भक्तिभावाने कुटूंबाची चाकरी? जेव्हा कमावते म्हणतात,तू मोडतेसं फूकटची भाकरी.... -पोळ कोमल सविता...